14 व 15 रोजी ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट चा इशारा

कल्याण ।। दि. 14/07/2022 व दि. 15/7/2022 रोजी होणाऱ्या अतिवृष्टीमुळे ठाणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट चा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांना होऊ नये याकरिता ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील इयत्ता बारावी पर्यंतच्या (प्री स्कूल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक) सर्व शाळांना गुरुवार दि. 14/07/2022 ते शुक्रवार दि.15/07/2022 पर्यंत जिल्हाधिकारी ठाणे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्यामार्फत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तथापि सदर कालावधीत शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करणे गरजेचे आहे असेही सदर आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

त्या अनुषंगाने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील इयत्ता बारावी पर्यंतच्या (प्री स्कूल, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक) सर्व शाळांना गुरुवार दि. 14/07/2022 ते शुक्रवार दि.15/07/2022 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे, अशी माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी विजय सरकटे यांनी दिली आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट