मुलांनी मनपा शाळांमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी अधिकारी शिक्षक यांनी विशेष प्रयत्न करावेत : आयुक्त डॉ, विजय सूर्यवंशी

कल्याण ।। शाळाबाह्य मुलांनी  महापालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश घ्यावा यासाठी महापालिका अधिकारी, शिक्षक यांनी विशेष प्रयत्न करावेत, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर *"गुढी पाडवा- शाळा प्रवेश वाढवा"* या महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेनुसार आज महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व आयुक्तांच्या  सुविद्य पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांनी स्वतः महापालिकेच्या बारावे येथील महात्मा फुले प्राथमिक  विद्यालय, शाळा क्र. 68 येथे समक्ष उपस्थित राहून 18 दाखलपात्र मुलांना शाळेत प्रवेश देऊन त्यांचा उत्साह वाढविला त्या वेळी बोलताना त्यांनी वरील उद्गार काढले. महापालिकेच्या शाळेच्या पट वाढवावा आणि जास्तीत जास्त शाळाबाह्य मुलांनी महापालिकेच्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

आजचा विद्यार्थ्यांचा प्रवेश हा प्रवेशोत्सव आहे, महापालिकेच्या 59 शाळांमध्ये एक दिवस आपण *प्रेरणा दिवस* म्हणून साजरा करूया, त्याचप्रमाणे महापालिका अधिकारी यांनी महापालिकेची एक-एक शाळा दत्तक घेऊन तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत  असेही ते पुढे म्हणाले. महापालिका शिक्षक खूप चांगलं काम करीत आहे त्यांनी आणखी झोकून देऊन तळमळीने काम करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यासमयी महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त शिक्षण अनंत कदम, महापालिका सचिव संजय जाधव, प्रशासन अधिकारी जे.जे. तडवी शिक्षण विस्तार अधिकारी   विजय सरकटे, माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, कार्यक्रम अधिकारी अर्चना जाधव ,शाळेतील मुख्याध्यापक,  शिक्षक वर्ग व इतर मान्यवर  उपस्थित होते.

आजच्या वर्षाच्या पहिल्या दिवशी  कल्याण-डोंबिवली येथील  महापालिकेच्या 59 शाळांमध्ये महापालिका अधिकारी वर्गांने समक्ष उपस्थित राहून दाखलपात्र  विद्यार्थ्यांना आज प्रवेश दिला आणि दाखलपात्र विद्यार्थ्यांचे गुलाबाचे फुल ,चॉकलेट बक्षीस देऊन स्वागत केले. महापालिका शाळांमध्ये  आज *पुस्तकांची गुढी* उभारल्यामुळे सर्व शाळांमध्ये उत्सहाचे  आणि भारलेले वातावरण दिसून येत होते.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट